Friday, 26 October 2012

     तो काही न बोलताच बरेच काही बोलून गेला. मी मात्र त्याच्या एक एक शब्दाला आसुसले होते. असे म्हणतात कि जो पर्यंत आपण काही गमावत नाही त्याची किंमत आपल्याला काळात नाही; पण हे हि तितकेच खरे कि जो पर्यंत आपण काही मिळवत नाही तो पर्यंत आपण काय हरवून बसलो होतो याचा अंदाज देखील येत नाही. तो असाच काहीसा वेड लावणारा, मंत्र मुग्ध करणारा होता.

     असो, त्याच्या सोबतीचे सर्व क्षण जपून ठेवले आहेत. पूर्वी केव्हा कधी केसात माळलेला गजरा तो हलक्या हाताने काढायचा तेव्हा अंग-अंगी रोमांच उभे राहायचे, आणि आता तसाच गजरा कोमेजून जाई पर्यंत जरी ठेवला तरी त्या वेड्याचा स्पर्श देखील होत नाही.

     आता त्याला भेटण्यासाठी त्याच्या आठवणीतच रुळावे लागते. खरच त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हो हा सन्मान !!

No comments:

Post a Comment