Tuesday 18 September 2012

     आपण निसर्गापासून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. असेच काहीसे माणूस आणि झाडाचे नाते असावे. माणसानं झाडासारखं असण्याचा केव्हातरी प्रयत्न करावा. कितीही उंच प्रगती केली तरी मुळं जमिनीत खोलवर रुजलेली. सर्वत्र पसरलेल्या फांद्या म्हणजे माणसाचे कर्तृत्व किंवा विचार क्षमता. त्या किती, कुठे वाढतील याचा काही नेम नाही. किती तरी वेळा त्या अनेक कारणास्तव छाटल्या जातात, तरी न खचता त्या वारंवार वाढतच राहतात. आपल्याला किती इजा होईल ह्याची परवा न करता हे झाड सदा वाढतच जातं व बहरतं. अर्थातच त्याला तसं मायेचं खत-पाणी व उब देखील लागतेच ना !!

     असो, एवढे असूनही हे झाड कधी कोणाला दुखावत नाही किंवा त्रासही देत नाही. किंबहुना सर्वांना संतुष्ट ठेवण्याचाच प्रयत्न असतो. हे झाड आशेचं एक जिवंत उदाहरण म्हणूनच, "वृक्षवल्ली आम्हा सोयरी" असे म्हटले असावे. 


     असेच माणसाने केव्हातरी होऊन पहावे, फक्त केव्हातरी एकदा.....

No comments:

Post a Comment