बसलो असता मी बागेत
आला होता क्षुब्द वात...
उडवून नेले सर्व पाचोळा
येऊन हाय शुद्र वारा...
दिले भिरकावून कुणीकडे ?
कोणास ठावूक कोठे नेले ?
दूर लांब कोठेतरी
जात जेथे कोणी नाही...
जेथे गडद काळोख
नाही कुणाची ओळख...
अश्या ठिकाणी तो पाचोळा
दूर एकदा पडला असता...
जीर्ण झाला, विरून गेला
मातीमोल झाला, नवे आयुष्य जगाया...
No comments:
Post a Comment